शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

सरकारकडून संभाजीराव भिडेंचा विश्वासघात : शिवप्रतिष्ठानचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:45 IST

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत.

ठळक मुद्देआंबेडकरांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत. तरीही त्यांच्याविरुद्ध दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करून सरकारने भिडेंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर यांना दंगलीस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

चौगुले म्हणाले, आंबेडकर हे थोर महान व्यक्तीचे वंशज आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे. सर्वच पक्ष जातीचे राजकारण करीत आहेत; पण आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. २८ मार्चला आमचा मोर्चा निघेलच. दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली भडकविण्याचा काहीजणांचा अजूनही उद्योग सुरू आहे. पुण्यात घेण्यात आलेली एल्गार परिषद ही जातीय दंगल भडकविण्यासाठीच होती. याचे संयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. भिडे यांचा दंगलीशी काहीही संबंध नाही. अगदी यमाला चौकशीसाठी नेमले तरी, सत्यच बाहेर येईल. कोरेगाव-भीमा दंगलीचा कट कोणी रचला? हे समाजासमोर आले पाहिजे. सरकार याप्रश्नी का गप्प आहे? हे समजत नाही. २८ मार्चच्या मोर्चानंतरही भिडे यांच्यावरील गुन्हे सन्मानपूर्वक मागे घेतले नाही तर, आम्ही दिल्लीत मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार आहोत. भिडे दोषी आहेत का नाहीत? याचे निवेदन करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.

चौगुले म्हणाले, २८ मार्चला राज्यभर, जिल्हास्तरावर मोर्चे काढले जाणार आहेत. बेळगाव, विजापूर, गोवा येथेही मोर्चे निघतील. अन्य राज्यात केवळ निवेदन दिले जाणार आहे. मोर्चाचे मुख्य केंद्र सांगली आहे. कर्मवीर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. राम मंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक या मार्गावरून हा मोर्चा स्टेशन चौकात जाऊन त्याचे सभेत रूपांतर होईल. सातजणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास जाणार आहे. कोणाचीही भाषणे होणार नाहीत. केवळ निवेदन दिले जाणार आहे. एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील. मोर्चातील सहभागी लोकांना १८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. रुग्णवाहिकाही ठेवल्या आहेत. आंबेडकर स्टेडियम, नेमिनाथनगर व शंभर फुटी रस्त्यावर पार्किंगची सोय केली आहे.आम्ही उघडे पाडूचौगुले म्हणाले, संभाजीराव भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. पुण्यातील एल्गार परिषदेत भाषणे करणाºया वक्त्यांवर गुन्हे दाखल करावेत. २ जानेवारील पुकारण्यात आलेल्या बंद काळात तोडफोडीत जे नुकसान झाले ते संबंधितांकडून वसूल करावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. जातीय विष पसरवरलं जात आहे. भिडेंना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. जाती-जातीमध्ये विष पेरणाºयांना आम्ही उघडे पाडू.सांगलीतील तपास थांबलासांगलीत ३ जानेवारीला बंद पुकारुन त्यास हिंसक वळण लावण्यात आले. तोडफोड करुन खासगी व शासकीय मालमत्तेचं लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. तोडफोड करणाºया व्हिडीओ चित्रीकरणात कैदही झाले. अज्ञांताविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र पोलिसांनी केवळ सात संशयितांची नावे निष्पन्न केली. यातील केवळ तिघांना अटक केली. पुढे तपास झालाच नाही. तपास जाणीवपूर्वक थांबवून संशयितांना पोलिसांनी एकप्रकारे अभय दिला असल्याचे चित्र आहे.